तु, गझल, लवलेटर, सही
डांबरगोळी, कवितेची वही
RS खंबा, रिकामा ग्लास
जपलेले मोरपिस, रूम भकास
पाळलेले ढेकुण, बाकी चुकलेले एकुण
विजेच् बिल, तुटलेल दिल.....
Condom च पाकिट, तुझ जाकिट…
महाराष्ट्राच्या इतिहासात
महाराजसाहेब आणि शंभुराजे यांच्यानंतर जर एखाद्या पराक्रमी आणि बुद्धिनेही तितक्याच् हुशार अश्या सेनापतीच नाव घ्यायच झाल्यास तर ते बाजीरावांच घ्यावे लागेल. मोगल, निजाम, हैदर, सिद्दी,पोर्तुगीज आणि इंग्रज यांसारख्या शत्रुना मात देत महाराजसाहेबांच स्वप्न बहुतांशी पूर्ण करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांच्यासारखा अजिंक्य योद्धा निराळाच.
वयाच्या केवळ १९व्या वर्षी मिळालेल पेशवेपद, उण्यापुर्या 40 वर्षाच्या आयुष्यात बत्तीस लढाया खेळून त्यातली एकही लढाई न हरलेला बाजीराव हा अजिंक्य आणि एकमेवाद्वितीय असाच आहे.
बाजीरावांनी खेळलेल्या लढ़ायांमधे त्यांचे युद्ध कौशल्या खासा दिसुन येते, मराठ्यांचे प्रमुख अस्त्र असलेला 'गनिमी कावा' आणि जलद हालचाली याचा वापर त्यांनी अगदी पुरेपूर करून घेतला. शत्रुला पेशवे नेमके कुठे आहे हे समजत नसे इतक्या त्यांच्या हालचाली वेगवान होत्या. जगप्रसिद्ध अशी 'पालखेडची लढाई' हे सर्वोत्तम उदाहरण.
शिवछत्रपतींचा 'पहिले ते सावधपण दूसरे ते राजकारण' हा मंत्र अगदी प्राणप्राणाने जपला होता. कोल्हापुर आणि सातारा गादीमधे विस्तवही जात नसताना दोन्ही बाजूस सांभाळून घेऊन राजकारण करीत स्वराज्य वाढीस नेण्याचे काम बाजीरावांनी लीलया केले. याकामी त्यांना साथ लाभली ती मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे यांच्यासारख्या शुर सरदारांची. या सगळ्या गोष्टी बाजीरावांच्या अनेक पैलुंचे दर्शन घडवितात.
बाजीराव जितके शुर होते तितकेच रसीक मनाचे सुद्धा होते, प्रेम का कराव आणि कराव याच
बाजीराव- मस्तानी हे सर्वोत्तम उदाहरण, दुर्दैवाने आम्ही फक्त त्यांच्याबद्दल अजुनही गैरसमज पसरवण्यातच धन्यता मानतो. आयुष्यभर क्षत्रियजीवन जगणाऱ्या या योध्याला चिरविश्रांती लाभली २८ एप्रिल १७४० नर्मदेकाठी 'रावेरखेड़ी'
अशा या शुर योध्याच्या कुडीतून प्राण जावा ते पण मोहिमेवर असतानाच याउपर त्यांचे थोर भाग्य ते कुठले.
अशा या रणमर्द पेशव्याला त्रिवार मुजरा.
#पेशवा
#gypsy